१८ वर्षाचा वनवास आत्ता संपणार! गांधीनगर -खरेलवाडीचा ठाम निर्धार!

१८ वर्षांचा वनवास आता संपणार! – गांधीनगर-खराळवाडीचा ठाम निर्धार!
दिनांक : १९ नोव्हेंबर २०२५ स्थळ : (HRNM)डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी, पिंपरी चौक, पिंपरी-चिंचवडविषय : प्रभाग क्र. ९ (गांधीनगर-खराळवाडी) मध्ये ‘बाहेरचा’ उमेदवार नाही! – फक्त ‘स्थानिक’ उमेदवारालाच सर्वपक्षीय इच्छुकांचे अभेद्य पाठबळ आणि विजयी करण्याचा एकमुखी निर्धार!पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ (गांधीनगर-खराळवाडी) परिसरातील नागरिकांमध्ये आज अभूतपूर्व एकजूट दिसून आली. सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी आणि परिसरातील संतप्त नागरिकांची तातडीची बैठक आज भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे ऐतिहासिक संख्येने पार पडली.गेल्या जवळपास दोन दशकांपासून (१८ वर्षे) गांधीनगर आणि खराळवाडी परिसर स्थानिक लोकप्रतिनिधींपासून वंचित राहिला आहे. ‘बाहेरच्या’ नगरसेवकांमुळे हा प्रभाग फक्त मतदानाचे केंद्र बनला आणि विकासापासून कोसभर दूर फेकला गेला! आता ही उपेक्षा सहन केली जाणार नाही, असा रणशिंग उपस्थितांनी फुंकले.
या आहेत आमच्या ज्वलंत समस्या – ज्या फक्त ‘स्थानिक’च सोडवणार!
प्रभागातील नागरिकांनी संताप व्यक्त करत खालील समस्यांचा पाढा वाचला, ज्या सोडवण्यात बिगर-स्थानिक उमेदवार पूर्णपणे अपयशी ठरले:| क्र. | समस्येचे स्वरूप
१ ) पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई – महिलांचा दररोजचा संघर्ष.
२ ) सार्वजनिक शौचालयांची लाजिरवाणी कमतरता – विशेषतः महिलांसाठी आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न.
३ ) अंतर्गत रस्त्यांची पूर्णपणे दुरवस्था – अपघातांचे प्रमाण वाढले.
४ ) दिवाबत्ती व्यवस्थेतील कायमचा खंड – रात्रीच्या वेळी गुन्हेगारीला आमंत्रण!
५ ) बेरोजगारी आणि तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता – भावी पिढी धोक्यात.
६ ) गुन्हेगारीमध्ये झालेली स्फोटक वाढ – शांतता व सुरक्षितता धोक्यात..
७ ) सरकारी योजनांचा गैरफायदा – गरजूंना लाभ नाही, फक्त मध्यस्थांची लूट आणि मनमानी.
८ ) विधवा, निराधार योजनांचा लाभ स्थानिकांपर्यंत पोहोचत नाही.
बैठकीतील ऐतिहासिक आणि निर्णायक ठराव
(सर्वानुमते)या समस्यांवरून हे स्पष्ट होते की, स्थानिक उमेदवारच या मातीतील वेदना ओळखतो आणि तोच त्वरित न्याय देऊ शकतो!> “सर्व राजकीय पक्षांनी कान उघडून ऐकावे! – प्रभाग क्र. ९ (अनुसूचित जाती राखीव जागेसाठी) मधून फक्त आणि फक्त ‘स्थानिक भूमिपुत्रालाच’ तिकीट द्यावे. जर कोणत्याही पक्षाने जाणूनबुजून ‘बाहेरील’ (परप्रांतीय/बिगर-स्थानिक) उमेदवार उभा करण्याचा दुस्साहस केला, तर गांधीनगर-खराळवाडी परिसरातील मतदार त्या उमेदवाराला ‘एकही’ मत देणार नाहीत. आम्ही ‘नोटा’ (NOTA) वापरू, पण बाहेरच्याला मतदान करणार नाही!”> हा अंतिम आणि अपरिवर्तनीय ठराव सर्वपक्षीय इच्छुक, महिला बचत गट, युवक मंडळे, सामाजिक संघटना व प्रभागातील प्रत्येक नागरिकाने शपथपूर्वक व दृढपणे संमत केला आहे.हा इशारा आहे! ही भूमिका नाही!जय भीम ! जय महाराष्ट्र ! आता फक्त स्थानिक – बाहेरचा नाही! गांधीनगर-खराळवाडीत ‘स्थानिक’ विकासाचा नवा सूर्य उगवणार!संपर्क : गांधीनगर-खराळवाडी कृती समिती(सर्वपक्षीय नागरिक व इच्छुक उमेदवार)